मान्यवरांची मतं

डॉ. मनमोहन सिंग

भारतातील आर्थिक व सामाजिक संक्रमणाचा वेध घेणाऱ्या ‘स्पर्धा काळाशी’ या अरुण टिकेकर संपादित या शरद पवारांच्या भाषणांच्या पुस्तकात माजी पंतप्रधान माननीय डॉ. मनमोहन सिंग म्हणतात, ‘आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कार्यक्रमास १९९१ साली आम्ही जो प्रारंभ केला त्या संदर्भात शरदजींच्या असलेल्या बांधीलकीचे मला स्मरण होते. किंबहुना, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी १९८० च्या दशकात राजीव गांधी यांनी उचललेल्या अनेक धाडसी पावलांना शरदजींनी पाठिंबाच दर्शविला होता.

अधिक वाचा…

डॉ. रघुनाथ माशेलकर

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर त्याविषयी म्हणतात, ‘यातील सर्व भाषणांतून सरांचा-पवारसाहेबांचा संख्यात्मकतेपेक्षा गुणात्मक वाढीवर असलेला भर दिसून येतो. ‘ज्ञानाधारित कृषिविकास’ हे त्यांचे ध्येय राहिले. पारंपरिक व आधुनिक ज्ञान यांना एकत्रित करून पुढे जायचे; असा त्यांना अट्टाहास असतो. शेतकरी जीवनाच्या प्रयोगशाळेत काम करीत असतो. तो स्वत: संशोधन करू शकतो यावरचा सरांचा विश्वास या पुस्तकात दिसून येतो.

अधिक वाचा…

डॉ. रघुनाथ माशेलकर

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर त्याविषयी म्हणतात, ‘यातील सर्व भाषणांतून सरांचा-पवारसाहेबांचा संख्यात्मकतेपेक्षा गुणात्मक वाढीवर असलेला भर दिसून येतो. ‘ज्ञानाधारित कृषिविकास’ हे त्यांचे ध्येय राहिले. पारंपरिक व आधुनिक ज्ञान यांना एकत्रित करून पुढे जायचे; असा त्यांना अट्टाहास असतो. शेतकरी जीवनाच्या प्रयोगशाळेत काम करीत असतो. तो स्वत: संशोधन करू शकतो यावरचा सरांचा विश्वास या पुस्तकात दिसून येतो.

अधिक वाचा…

डॉ. स्वामीनाथन

“हा तुमचा मुलगा मला (म्हणजे महाराष्ट्राला) द्या” असे म्हणून मा.यशवंतराव चव्हाण यांनी पवारांच्या मातेकडून शरदरावांना मागून घेतले आणि यशवंतरावांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत शरद पवारांची राजकीय घोडदौड सुरू झाली ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय कृषिमंत्री पदापर्यंत झेप घेत आजही सुरूच आहे. पाझर तलावांच्या माध्यमातून पवारसाहेबांनी केलेल्या जलसंधारण क्षेत्रातील यशस्वी प्रयोगाचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी आकाशवाणीवरून जाहीरपणे कौतुक केले.

अधिक वाचा…